संपूर्ण विश्वात सनातन वैदिक संस्कृती फारच जुनी आहे. जगाच्या पाठीवर या संस्कृतीचे हिंदू लोक अनेक देशांमध्ये वास्तव्य करून होते. त्याचे असंख्य पुरावे आपल्याला प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतात. विश्वव्यापक ही हिंदू संस्कृती काळाच्या पडद्याआड गडप होत होत आता केवळ नाममात्र भारत देशात औषधासारखी शिल्लक उरली आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. या हिंदू संस्कृतीच्यानंतर अनेक वर्षांनी उदयास आलेल्या अनेक संस्कृत्या (धर्म) आज विश्वव्यापी होत चाललेले आहेत. जगामध्ये मुस्लीम, इसाई इ. सारखे धर्म जगातील प्रत्येक देशात आपले स्वत:चे अस्तित्व निर्माण करू लागले आहेत.... नव्हे तर संपूर्ण देशच त्यांच्या मालकीचाच झाल्यासारखे चित्र आज अनेक देशात आहे. दोन्ही संस्कृत्यांना प्रचंड तहान लागली आहे.... अन्य संस्कृत्यांना पिऊन जगात केवळ एकमेव आपल्याच धर्मियांचे वर्चस्व असावे.... या स्पर्धेतून हिंदू धर्म गिळंकृत होतो की काय ? अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. हा माझा देश आहे असा एकही देश या पृथ्वीच्या पाठीवर हिंदू धर्मियांना अग्रहक्काने सांगण्यासाठी शिल्लक राहिलेला नाही.
भारतामध्ये थोडेफार हिंदू धर्मियांचे ऐकून घेतले जावू शकते अशी अल्प प्रमाणात परिस्थिती आहे. यास्तव भारतातील हिंदूंनी अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी जागृत होणे आवश्यक आहे. या धर्माला राजाश्रय नसल्याने मुस्लीम आणि ईसाई लोक भारत देशामध्येही हिंदूधर्मियांचे धर्मांतर करून लचके तोडत आहेत. भारतामध्ये अनेक राज्यात हिंदू अल्पसंख्यांक आहे. या देशातील उर्वरीत राज्यांमध्ये मुस्लीमांचे जेहादी लव आणि ख्रिश्चनांचे धर्मांतर हिंदू धर्मियांच्या अस्तित्वाला प्रचंड धक्का पोहचवित आहेत. यापूर्वी बंदुकीच्या धाकावर आणि तलवारीच्या टोकावर मुसलमानांनी आणि ख्रिश्चनांनी या देशातील हिंदूना बाटवलेले आहेच, ते कदाचित त्यांच्या दृष्टीने कमी काम झाले असावे. याकरिता राजाश्रयाच्या जोरावर खुलेआम मुस्लीम जेहादी लव मार्फत हिंदू मुलींना मुसलमान बनवित आहेत, तर ख्रिश्चन हिंदूंच्या गरीबीचा आणि अज्ञानाचा फायदा घेवून बाप्तीस्मे करत आहेत.
खरे तर या देशात समान नागरीकायदा आवश्यक आहे, हे केवळ धर्मगुरू म्हणून आमचे मत नसून सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला अनेकवार समान नागरीकायदा करणेबाबत सुचविलेले आहे. परंतु लांगूलचालन करणेकरीता राजकर्ते जाणूनबुजून या गोष्टीकडे दूर्लक्ष करत आहेत. हिंदू धर्माचे अस्तित्व टिकून राहण्याकरिता किमानपक्षी धर्मांतर बंदी कायदा झाला असता तर ख्रिश्चन आणि मुसलमान लोकांकडून आज जी धर्मांतरे होत आहेत ती झाली नसती. शासन काही करत नाही आणि वरील कम्युनिटी हिंदूंना स्वस्थ जगू देत नाहीत, मग धर्माचे रक्षण करण्याकरीता जे - जे हिंदू हे लोक बाटवत आहेत, त्या - त्या हिंदू कुटूंबियांना पुन:श्च शुद्ध करून घेवून या धर्मांध मंडळींना आवर घालायला नको का ?
आम्ही लाखो कुटूंबियांना पुन:श्च हिंदू धर्मात आणून ही शुद्धीकरणाची मोहिम हाती घेतल्याने ईसाई मिशनरींच्या कार्याला काही प्रमाणात आळा बसत आहे. आमच्यासारखे शुद्धीकरणाचे कार्य आमचे शंकराचार्य आणि उर्वरित रामानंदाचार्य तसेच आमचे अन्य साधुसंत करू लागले तर आमचे बाटलेले हिंदू पुन:श्च हिंदू धर्मात सन्मानाने येवू शकतील. तुम्ही धर्माचे रक्षण केलेत तरच धर्म तुमचे रक्षण करतो.... धर्मामुळेच एकजूट होऊ शकते.... ऐक्यापुढे राजसत्ता ही दुबळी पडते. आज ज्या - ज्या धर्माचे ऐक्य आहे, त्या - त्या धर्मांचे लांगुन चालन करण्यासाठी राजसत्ता आसुसलेली आहे.... तुमचे देव, तुमची संस्कृती, तुमचे स्वतंत्र आचार - विचार अबाधित रहायला पाहिजे असतील तर धर्माचे रक्षण ही हिंदूधमयांसाठी काळाची गरज आहे.
आम्ही धर्मांध नाही, अन्यथा अन्य धर्मातील लोकांना हिंदू धर्माची दिक्षा देवून या धर्मात आणणे या हिंदू धर्माला अशक्य नाही. आम्ही सहिष्णुवादी असल्यामुळेच असा अविचार आमच्या मनाला शिवत नाही. आम्ही जरूर धर्माभिमानी आहोत.... आमच्या धर्माचे रक्षण करणे.... धर्माबद्दल जागरूकता निर्माण करणे.... हे आमचे आद्यकर्तव्य नव्हे का ? याचा अर्थच विश्वबंधुत्व नाकारणे असा होत नाही. विश्वबंधुत्वासाठी आम्ही तयार आहोत. परंतु जर कोणी जाणूनबुजून आमच्या बांधवांच्या आथक परिस्थितीचा, त्यांच्यामध्ये असलेल्या अज्ञानाचा फायदा उठवून धर्मांतरे करणार असेल तर त्याला जशास तसे उत्तर म्हणून शुद्धीकरण करणे हा माझा वज्रनिर्धार आहे.
Read more...